बागरोजा हडको येथे छत्रपती शिवाजी महाराजाच्या जंयतीनिमित्त आकर्षक सजावट
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराज यांनी आठरा पगड जातीतील लोकांना एकत्र करून जनतेचे स्वराज्य निर्माण केले. छत्रपतीनी सदैव रयतेचा व शेतकर्यांच्या हिताचा विचार केला त्याचा इतिहास प्रेरणादायी व वैभवशाली आहे. छत्रपती शिवाजी हे अत्यंत धैर्यशील व उत्कृष्ट नेतृत्व असलेले नेते होते. शिवाजी महाराज हे महान पराक्रमी होते आजच्या युवा पिढीने छत्रपतीचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून आचरण करून त्यांची शिकवण अंगिकारावी असे प्रतिपादन माजी विरोधी पक्ष नेता संजय शेंडगे यांनी केले. बागरोजा हडको येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जंयती निमित्त आकर्षक सजावट करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतांना शहर प्रमुख दिलीप सातपुते शहर प्रमुख संभाजी कदम, माजी विरोधी पक्षनेता संजय शेंडगे, माजी महापौर सुरेखा कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी विरोधीपक्ष नेता संजय शेंडगे, नगर सेवक योगिराज गाडे, नगर सेवक सचिन शिंदे, नगर सेवक प्रंशात गायकवाड, नगर सेवक विजय पठारे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव, संतोष गेणप्पा, गणेश पिस्का, चेतन गुंदेचा उपस्थित होते.
No comments:
Post a Comment