मनपाच्या आगामी अर्थसंकल्पातून शहर विकासाचे प्रकल्प राबवावे- आ.संग्राम जगताप
‘स्थायी’ सभापतीपदाचा अविनाश घुलेंनी स्विकारला पदभार
सर्वांना बरोबर घेवून स्थायी समितीचा कारभार केला जाईल व शहरातील नविन नविन विकास कामांच्या मंजूरीसाठी प्रयत्न करणार आहे. दुस-यांदा स्थायी समिती सभापती पदाची संधी मिळाली आहे. या अनुभवाचा फायदा काम करताना निश्चित होईल. मा.आ.श्री.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू.
- अविनाश घुले, सभापती स्थायी समिती
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पक्षीय राजकारण बाजूला ठेवून शहर विकासाचे सर्वजण काम करित आहेत. कै.शंकरराव घुले यांनी शहर विकासाला नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून एक चालना दिली. त्यांच्या विचाराचा वारस अविनाश घुले यांनी पुढे सुरू ठेवला आहे. शंकरराव घुले यांनी हमाल पंचायतच्या माध्यमातून सर्व सामान्याचे प्रश्न मार्गी लावले. सर्वांना बरोबर घेवून काम करण्याची पध्दत आजच्या तरूण पिढीला मार्गदर्शक आहे.स्थायी समितीचे सभापतीपदी मा.श्री.अविनाश घुले यांना सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी शहर विकासासाठी बिनविरोध निवडून दिले आहे. त्यांनी सर्वांना बरोबर घेवून शहर विकासाच्या कामाला गती दयावी येणारा मनपाचा अर्थ संकल्पामध्ये शहर विकासाचे प्रकल्प राबवावेत असे मत आ. संग्रात जगताप यांनी व्यक्त केले. अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाचा पदभार मा.श्री.अविनाश घुले यांनी आज स्विकारला. याप्रसंगी आ. संग्राम जगताप बोलत होते.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, सभागृह नेता मनोज दुलम, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती सौ.लताताई शेळके, नगरसेवक मा.श्री.गणेश भोसले, मनोज कोतकर, समद खान, संजय चोपडा, कुमार वाकळे. मा.डॉ.सागर बोरूडे, विपुल शेटीया, मा.बाळासाहेब बारस्कर, अजिक्य बोरकर, बाळासाहेब पवार, महेंद्रभैय्या गंधे, अशोक गायकवाड, मा.श्री.निखील वारे, रविंद्र बारस्कर, विलास ताठे, सुनिल कोतकर, संजय ढोणे, भा कुरेशी, दगडूमामा पवार, दत्ता गाडळकर, मा.श्रीमती रेश्मा आठरे, अमोल गाडे, अंजली आव्हाड, उबेद शेख, मा.श्री.संदिप कर्डिले, दत्ता तापकिरे, योगेश गलांडे, मा.श्री.आकाश दंडवते, मा.श्री.योगेश ठुबे, मा.श्री.माऊली जाधव आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment