के. जी .महाविद्यालयात महिला दिन साजरा
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः घर व समाजात आपल्या विचारांचा प्रवाह बदलून मुला इतकेच मुलीला वागणूक देऊन एक सक्षम नागरिक घडवणे आवश्यक असून त्यातुनच पुढील आदर्श समाज निर्माण होईल असे प्रतिपादन येथील के. जी. कला व वाणिज्य रात्र महाविद्यालयात झालेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ स्वाती मुनोत यांनी केले.
कार्यक्रमात विविध शाखेतील शाखा प्रमुख सदस्य महिला उपस्थित होत्या. मराठी विभाग प्रमुख डॉ. वर्षा कीर्तने व सह अध्यापिका सविता चव्हाण, बी. सी. ए. (सी. ए.) विभाग प्रमुख प्रा. स्नेहल बोरावके, सौ. अमृता मुळे, सौ. सविता केदारे आदि महिलांनी या दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आनंद त्रिपाठी यांनी केले. सत्कार प्रा. योगेश चाकोते , श्री. निखिल मुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. वीरेंद्र पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment