धूलिवंदनला हुतात्मा स्मारकात राष्ट्रीय उन्नत चेतना गॅझेट प्रसिद्ध - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 30, 2021

धूलिवंदनला हुतात्मा स्मारकात राष्ट्रीय उन्नत चेतना गॅझेट प्रसिद्ध

 धूलिवंदनला हुतात्मा स्मारकात राष्ट्रीय उन्नत चेतना गॅझेट प्रसिद्ध

कोरोनाला कारणीभूत असलेल्या लोककर्कांना मृतांजली वाहून त्यांच्या नावाचा शिमगा

नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने धूलीवंदनला हुतात्मा स्मारकात राष्ट्रीय उन्नत चेतना गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले. तर कोरोना संक्रमणाचा उद्रेक होत असताना तोंडावर मास्क न वापरणारे, नियमांचे पालन न करणारे लोककर्क असल्याचे जाहीर करुन, त्यांच्या नावाने बोंबा मारण्यात आल्या. अशा लोककर्कांना मृतांजली वाहून अनागोंदी थांबविण्यासाठी बिलिफ इनरिचमेंट बायोटेक्नोलॉजी तंत्राचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, सुहास मुळे, शाहीर कान्हू सुंबे, जालिंदर बोरुडे, विठ्ठल सुरम, पोपट भोसले, ओम कदम, अशोक भोसले आदी उपस्थित होते.
   समाजात उन्नत चेतनेचा अभाव असल्याने कोरोना महमारी फैलावत आहे. मास्क न वापरणारे व नियमांचे पालन न करणारे हे लोककर्काची भूमिका पार पाडत आहे. तर तमस चेतनेमुळे जातीच्या उतरडी निर्माण होऊन समाजात भ्रष्टाचार व अनागोंदी माजली आहे. उन्नत चेतनेने समाजात बदल होण्याची अपेक्षा असून, यासाठी राष्ट्रीय उन्नत चेतना गॅझेट प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.  
   अ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, उन्नत चेतनेचा विकास होण्यासाठी बिलिफ इनरिचमेंट बायोटेक्नोलॉजी हा तंत्र अवलंबण्याची गरज आहे. देशात शिक्षणाचा प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. यामुळे अनेक अधिकारी व पुढारी समाजातील जबाबदार पदावर गेले. मात्र त्यांच्यात उन्नत चेतनेचा अभाव असल्याने सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे होताना दिसत नाही. स्वार्थीवृत्तीमुळे समाजाचे मोठे नुकसान होत असून, देशात दारिद्रय, बेकारी व अनागोंदी पसरली आहे. हे रोखण्यासाठी उन्नतचेतनेशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. अशोक सब्बन यांनी मागील वर्षी कोरोना संक्रमणाच्या हाहाकाराने अनेकांचे बळी गेले, अनेकांचा रोजगार हिरावला गेला. तरी देखील या दुसर्या लाटेत सर्वसामान्य जनता सुधारण्यास तयार नाही. लोक सारासार विवेक सोडून वागल्याने कोरोनाचे संक्रमण वाढले आहे. समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी शिक्षणाबरोबर सुंस्कृत नागरिक घडणे अत्यावश्यक असल्याची भूमिका मांडली.

No comments:

Post a Comment