जुने नळ कनेक्शन जोडणीचे कामासाठी पैसे मागणे अन्यायकारक ः शेख
भाजप महिला अल्पसंख्याक आघाडीचे उपायुक्तांना निवेदननगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहराच्या अनेक भागात फेज-2 पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून, सदर भागातील रहिवाशांना जुने नळ कनेक्शन फेज-2 ला जोडण्यासाठी प्रत्येकी 1500 रुपयांची मागणी महानगरपालिकेकडून होत आहे, ही अतिशय अन्यायकारक असल्याबाबतचे निवेदन भाजपा महिला अल्पसंख्याक आघाडीच्यावतीने मनपा उपायुक्ता यशवंत डांगे यांना देण्यात आले. याप्रसंगी भाजप महिला अल्पसंख्याक आघाडीच्या सरचिटणीस फरीदा अ.लतीफ शेख, हुसेना शेख, शेख नाजनीन, शेख हसीना, शेख कौसर, शेख रजिया, शेख शमीम, शेख नसीम, अल्पसंख्याक आघाडी प्रमुख हाजी अन्वर खान आदि उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, नुकतेच कोरोनासारख्या महामारीच्या संकटातून सावरत असतांनाच पुन्हा कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्णच कोलमडले असून, काही दिवसांवरच मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिन्यास सुरुवात होणार असून, या निमित्ताने कुटूंब चालविणे जिकरीचे झाले आहे. आर्थिक चणचणीमुळे सर्वसामान्यांना खर्चाचा ताळमेळ घालणे कठिण होत आहे, अशा परिस्थितीत मनपाच्यावतीने खाजगी ठेकेदारामार्फत सावकारासारखे घरोघर फिरुन रु.1500 त्वरीत भरा अन्यथा आपले नळ कनेक्शनचे काम होणार नाही, असे धमकावले जात आहे.
वास्तविक पाहता सर्वसामान्य नागरिक हे मनपाचे टॅक्सेस व पाणीपट्टी भरत असतांना जुने कनेक्शन असतांना पुन्हा नवीन कनेक्शनसाठी पैसे मागणे हा सर्वसामान्य नागरिकांवर होणारा अन्याय आहे. तरी आयुक्त साहेबांनी विनंती करण्यात येत आहे की, मनपाच्या खर्चाने फेज-2 चे नळ जोडणी करुन देण्यात यावी. अन्यथा आम्ही आयुक्त साहेबांच्या केबीनमध्ये ठिय्या आंदोलन करु. महिला नागरिकांच्या संतापाच उद्रेक झाल्यास मनपा प्रशासन यास संपूर्ण जबाबदार राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी भाजपा महिला अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकारी व परिसरातील रहिवासी, नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment