शहरातील उड्डाणपुलास महात्मा फुले यांचे नाव द्यावे
बहुजन सेवा संघ व फिनिक्स फाउंडेशनची मागणीनगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहरातील चालू असलेल्या उड्डाणपुलास क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी बहुजन सेवा संघ व फिनिक्स फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आली अशा मागणीचे निवेदन बहुजन सेवा संघ व फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्या कडे कार्यवाहीसाठी देण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने या होणार्या उड्डान पुलास क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्याची तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी बहुजन सेवा संघ व फिनिक्स फौंडेशन व इतर सामाजिक संघटनांनी केले आहे.
अहमदनगर शहरांमध्ये क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ अहमदनगर येथेच शिक्षण घेऊन केली असे महान कार्य अहमदनगर शहरात घडल्यामुळे त्यांचे नाव देणे उचित होईल याची सर्वांना खात्री आहे.
No comments:
Post a Comment