कल्याण रोड पाणी प्रश्नासाठी सचिन शिंदेंचे आमरण उपोषण
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिवसेनेचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी कल्याणरोड परिसराच्या पाणीप्रश्नासाठी आजपासून महापालिकेमध्ये आमरण उपोषणास आजपासून सुरुवात केली. जोपर्यंत कल्याणरोड परिसराचा पाणीप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा इशारा यावेळी नगरसेवक शिंदे यांनी महापालिका प्रशासनास दिला.
कल्याणरोड परिसराचा विस्तार मोठ्या झपाट्याने होत असून नागरी लोकवस्ती वाढत आहे. परंतु गेल्या पंधरा वर्षापासून या भागाचा पाणी प्रश्न गंभीर स्वरूपाचा बनलेला आहे. या भागातील नागरिकांना पाणी समस्याला वारंवार तोंड द्यावे लागत आहे. महापालिका प्रशासनाला निवेदन देऊनही पाणी प्रश्न सुटलेला नाही. विविध आंदोलने, रस्ता रोको, पालिकेत नागरिकांसह पालिका प्रशासनाबरोबर पाणी प्रश्नाबाबत हजोरोवेळा चर्चा झाली. तरीसुद्धा पाणी प्रश्न सुटलेला नाही. कल्याणरोड परिसरातील गणेशनगर येथे दहा वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधून तयार आहे. परंतु या टाकीमध्ये आजपर्यंत पाणी आले नाही. त्यामुळे या भागामध्ये तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई आहे.
तरी महापालिकेने गणेशनगर भागातील टाकीमध्ये पाणी पुरवठा करून सर्वभागाला पूर्णक्षमतेने पाणी द्यावे. जोपर्यंत सुरळीत सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
अनेकवेळा महापालिकेने पत्रव्यवहार करून दिलेले आश्वासने पूर्ण केली नाही. त्यामुळे पालिकेवरचा आमचा विश्वास उडाला आहे. पालिका संपूर्ण शहराला दिवसाआड पाणी पुरवठा करते व कल्याण रोड भागालाच दहा बारा दिवसांनीच पाणी पुरवठा का केला जातो. याभागातील नागरिक 100 टक्के महापालिकेचा कर भरला जातो. तरीसुद्धा कल्याण रोड भागावर पाणी प्रश्नाबाबत अन्याय का केला जातो? असेही शिंदे म्हणाले.
No comments:
Post a Comment