साई उद्यानाची पाहणी प्रकल्प अधिकारी हर्षा नारखडे कडून..
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगरसेवक गणेश भोसले यांनी हे ओळखून गेल्या 10 वर्षापासून प्रभागामध्ये लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचे काम केले असल्यामुळे आज प्रभाग 14 हा हरित प्रभाग म्हणून ओळखला जात आहे. त्यांनी बुरुडगाव रोडवरील साई उद्यान निर्माण करून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली. त्यामुळे साई उद्यान हे आज संपूर्ण वेगवेगळ्या जातीच्या वृक्षांनी फुललेले आहे. प्रकल्प अधिकारी हर्षा नारखडे यांनी बुरुडगावरील या उद्यानाची पाहणी केली. याप्रसंगी हर्षा नारखडे म्हणाल्या की, शहरातील नागरिकांनी घरोघरी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर कंपोस्ट खत तयार करण्याची प्रक्रिया राबवावी. त्यामुळे घरातील ओला व सुका कचर्यावर प्रक्रिया होऊन खत निर्मितीसाठी मदत होते तसेच शहर स्वच्छ राहण्यास आपले योगदानही मिळते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियान व राज्य सरकारचे माझी वसुंधरा अभियानाचे केंद्र व राज्य सरकारचे पथक शहरात येऊन पाहणी करणार आहे. अहमदनगर महापालिकेने या अभियानत भाग घेतला असून नागरिकांच्या सहकार्यातून आपण भारत स्वच्छ अभियानामध्ये फाईव्ह स्टार मानांकन नक्कीच मिळवू. असेही त्या म्हणाल्या.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा नाश होत चालला आहे. यामुळे क्रतुमानात व वातावरण वारंवार बदल होत आहेत. याचा विपरित परिणाम मानवी जीवनावर होत आहे. यासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची खरी गरज आहे.
या अभियानासाठी नगरकरांनी सहकार्य करावे व आपणास विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सकारात्मकपणे द्यावी. माहिती स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख यांनी दिली. यावेळी प्रकल्प अधिकारी राहुल अहिरे, राजेंद्र सामल, लक्ष्मण लांडगे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment