सर्वज्ञानी उद्योगिनी महिला विकास मंचच्यावतीने महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण
महिला दिनानिमित्त रंगल्या होत्या ऑनलाईन स्पर्धा
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सर्वज्ञानी उद्योगिनी महिला विकास मंचच्या वतीने महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षिस वितरण करण्यात आले. संचेती सारी येथे झालेल्या बक्षिस वितरण कार्यक्रमात विजेत्या महिलांना निर्मला संचेती यांच्या हस्ते साड्यांचे बक्षिस देण्यात आले. यावेळी सर्वज्ञानी मंचच्या संस्थापिका आरती काळपुंड, सुचिता देवचक्के, शीतल चोरडिया आदींसह महिला उपस्थित होत्या.
महिला दिनाचे औचित्य साधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी ऑनलाईन पध्दतीने छायाचित्रण, निबंध व गायन स्पर्धा ठेवण्यात आली होती. या स्पर्धेस महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. तसेच अनेक ज्येष्ठ महिला देखील या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. यामध्ये गायन स्पर्धेत प्रथम- शर्मिला कंगे, द्वितीय- नम्रता जहागीरदार, तृतीय- डॉ. योगिता सत्रे, चतुर्थ- सृष्टी यागनिक, उत्तेजनार्थ- लता काळपुंड, निबंध स्पर्धा- प्रथम- चैत्राली वनारसे, द्वितीय- विद्या लहारे, तृतीय- अनामिका म्हस्के, चतुर्थ- पूनम खोपटीकार, छायाचित्रण स्पर्धा- प्रथम- बबिता गांधी, द्वितीय- नीलम लोधा, तृतीय- कल्याणी भालेकर, चतुर्थ- उज्वला मुरकुटे यांनी बक्षिसे पटकाविली. स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजक एस.जी. कायगावकर, सहप्रायोजक अमित अकॅडमी आणि संचेती सारी यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेत सहभागी झालेल्या महिला व स्पर्धेचे प्रायोजकांचे आरती काळपुंड यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वज्ञानी उद्योगिनी महिला विकास मंचच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment