महाशिवरात्रीनिमित्ताने आ. रोहित पवार विचार मंचाच्यावतीने स्वच्छता अभियान
नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः महाशिवरात्रीच्या निमित्ताने आमदार रोहित दादा पवार विचार मंचाच्या वतीने शुक्रवार पेठ येथील महादेवाचे मंदिर व मंदिर परिसर व जुन्या बारवेची स्वच्छता करण्यात आली.या बाबत माहिती अशी की आ.रोहितदादा पवार विचार मंच आयोजित स्वच्छता अभियान च्या माध्यमातून आतापर्यंत खर्डा येथील सहा ठिकाणचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे या स्वच्छता मोहीमेला आता खरे व्यापक स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे महिलांचा व ग्रामस्थांचा सहभाग या स्वच्छता अभियानात वाढत असल्याने विचार मंचाच्या कार्यकर्त्यां मध्ये ऊसाह वाढत आहे मंदिरातील स्वच्छता व समोरील प्राचीन काळातील बारवेच्या पायर्यांची स्वच्छता व तुंबलेल्या गटारीची वाट मोकळी यावेळी करण्यात आली अशाच प्रकारे पुढील काळात कार्यकर्त्यांनी व खर्डा ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन आ.रोहितदादा पवार विचार मंचाचे अध्यक्ष दत्तराज पवार यांनी केले या मोहिमेत उपसरपंच रंजना लोखंडे,शीतल शिंदे,नीता पवार,जयश्री साळुंके,माजी ग्रामपंचायत सदस्य वैशाली थोरात, सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत गोलेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, विकास शिंदे, बापूसाहेब ढगे,श्रीकांत लोखंडे, दत्तात्रय भोसले,अवि सुरवसे,भीमा घोडेराव, दिपक जावळे, सुनील साळुंके, तुळशीदास गोपाळघरे,अशोक खटावकर, संजय पेडगावकर, पत्रकार संतोष थोरात, प्रा,धनंजय जवळेकर, प्रा,महेश बजबुडे,प्रा,सदानंद जाधव, सूरज जगताप, सुशील शिंदे,ज्ञानदेव इंगोले,शशिकांत वैद्य,इ,सह खर्डा ग्रामस्थ उपस्थित होते.या स्वच्छतेच्या ठिकाणी सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी भेट देऊन कामाचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment