आष्टीत सत्र न्यायालयाच्या स्थापनेसाठी आ. आजबे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 8, 2021

आष्टीत सत्र न्यायालयाच्या स्थापनेसाठी आ. आजबे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 आष्टीत सत्र न्यायालयाच्या स्थापनेसाठी आ. आजबे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः तालुक्यात सामान्य जनतेची अनेक दिवसापासून आष्टी येथे सत्र न्यायालय स्थापन व्हावे अशी मागणी आहे. त्या अनुषंगाने आ.बाळासाहेब आजबे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आष्टीत न्यायालय व्हावे यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी केली यावेळी मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक निर्णय घेऊन असे आश्वासन दिले आष्टी तालुक्यामध्ये 122ग्रामपंचायत व 55 वाड्या-वस्त्या तांडे आहेत तसेच जिल्ह्याचे ठिकाण हे आष्टी शहरापासून शंभर किलोमीटर अंतर आष्टी तालुक्यातील शेवटचे गाव 130ते 140 किलोमीटर अंतरावर आहे. अशा परिस्थितीत पक्षकारांना सत्र न्यायालयासाठी कामासाठी बीड येथे जाणे गैरसोयीचे होते. तसेच सत्र न्यायालयासाठी आवश्यक असलेल्या फायलिंग सुद्धा आष्टी न्यायालयातील होत. आहेत व आष्टी येथील न्यायालयांच्या नवीन इमारती मध्ये सत्र न्यायालयाच्या कामासाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्यामुळे व जनतेची गैरसोय टाळण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आ. आजबेंनी केली असून मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी याबाबत लवकरच योग्य तो सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment