शालेय पोषण आहारापासुन मुले 5 महिन्यांपासून वंचित असल्यामुळे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांना पोषण आहार देऊन गांधीगिरी ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 17, 2021

शालेय पोषण आहारापासुन मुले 5 महिन्यांपासून वंचित असल्यामुळे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांना पोषण आहार देऊन गांधीगिरी !

 शालेय पोषण आहारापासुन मुले 5 महिन्यांपासून वंचित असल्यामुळे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांना पोषण आहार देऊन गांधीगिरी !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यातील विद्यार्थी शालेय पोषण आहारापासुन पाच महिन्यांपासून वंचित असलेल्या मुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक शिवाजी शिंदे यांना पोषण आहार देऊन गांधीगिरी केली यावेळी जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे,जिल्हा परिषद सदस्य अशोकराव खेडकर, सोमीनाथ पाचारणे आदी उपस्थित होते.
अधिकार्‍यांच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील पाच महिन्यापासून विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याचे भाजपा गटनेते जालिंदर वाकचौरे म्हणाले.
खरंतर कोरोनाच्या काळात आठ नऊ महिने शाळा बंद होत्या त्या काळात पोषण आहार वाटला असं कागदावर दिसते परंतु प्रतक्ष वाटला का नाही याची चौकशी झाली पाहिजे आता पाच महिने झाले पाचवी ते आठवी शाळा सुरू आहे परंतु त्यांना पाच महिन्यापासून पोषण आहार  मिळत नाही अधिकारी सांगतात की ठेकेदारांची मुदत नोंहेबर ला संपली मग नोंहेबर ला वाहतुकीच्या ठेकेदारांची मुदत संपणार होती मग त्याचे नियोजन आधीच का केले नाही नियमाने एक दिवस सुद्धा एकही विध्यार्थी पोषण आहारा पासून वंचित ठेवता येत नाही मग आता पाच महिन्या पासून वंचित राहिले याला जबाबदार कोण व त्यांच्यावर काय कारवाई करणार ? गोरगरीबाच्या मुलासाठी आलेला पोषण आहाराचा तांदूळ 107 मेट्रिक टन गोदामात पडून आहे तो आता सडून जाईल ,खराब होईल याला जबाबदार कोण ? आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रम्ह मग याची अशीच नासाडी होऊन द्यायची का ? त्यामुळे तातडीने पोषण आहार मुलांना मिळेल असे नियोजन अधिकारी,पदाधिकार्‍यांनी करावे व नेहमीप्रमाणे न वाटलेल्या पोषण आहाराची बिले निघणार नाही याची काळजी घ्यावी.

No comments:

Post a Comment