ग्रामीण खेळाडूंना संधी मिळणे गरजेचे- ठोंबरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 19, 2021

ग्रामीण खेळाडूंना संधी मिळणे गरजेचे- ठोंबरे

 ग्रामीण खेळाडूंना संधी मिळणे गरजेचे- ठोंबरे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः ग्रामिण भागातील खेळाडूंना खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी विवीध स्पर्धांचे आयोजन करण्याची गरज असल्याचे मत हिंदू राष्ट्र सेनेचे सागर ठोंबरे यांनी केले.
जेऊर येथे सुरु असलेल्या नामदार चषक क्रिकेट स्पर्धेस सागर ठोंबरे व आमदार संग्राम भैय्या फाउंडेशनचे किरण गुंजाळ यांनी भेट दिली. त्याप्रसंगी स्पर्धेचे आयोजक जय भवानी उद्योग प्रक्रियेचे चेअरमन प्रेमचंद आढाव, सोमनाथ तोडमल, वाजीद सय्यद, किरण पाटोळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सागर ठोंबरे यांनी ग्रामिण भागात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना खेळात प्राविण्य मिळवण्यासाठी ग्रामिण भागात विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्याची गरज आहे. दिवसेंदिवस खेळांची मैदाने संपुष्टात येत असल्याबद्दल ठोंबरे यांनी खेद व्यक्त केला.
याप्रसंगी सुनील वाघमारे, शशिकांत मगर, अमोल पाटोळे, सुमेश पानपाटील, सागर पाटोळे यांच्यासह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment