महावितरणच्या कर्मचार्यांकडून जीव मुठीत घालून दुरुस्तीचे काम
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शहरातील माळीवाडा आशा टॉकीज या ठिकाणी असणार्या वीज खांबावरील दुरुस्तीसाठी महावितरणच्या कर्मचार्याला आपल्या जीवावर उदार होऊन काम करीत असल्याचे पहावयास मिळाले.यात वीज खांबावर तारांचा गुंता पाहावयास मिळाला यामध्ये पाय अडकून सदरील कर्मचार्यास दुखापत होऊ शकते या वीज कर्मचार्याने कुठल्याही प्रकारचे रबरी हातमोजे, रबरी बूट,न घालून काम करत असल्याचे निदर्शनास आले याबाबत चौकशी केली असता महावितरण कडून कुठल्याही सुरक्षितता साहित्य पुरवण्यात येत नसल्याचे बोलून दाखवले सदर घटनेची माहिती घेतली असता या ठिकाणी असणार्या एका व्यापाराची वीज गेली असल्यामुळे सदरची दुरुस्ती केली जात असल्याची माहिती मिळाली.मागील महिन्यातच महावितरणच्या एका कंत्राटी कर्मचार्याचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता. त्यामुळे महावितरण’कडून आतातरी या कर्मचार्यांच्या जीवाशी खेळणे सोडून त्यांना योग्य ती सुरक्षितता पुरवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
No comments:
Post a Comment