आईचा हत्यारा कधी होईल गजाआड; मुलांचा आक्रोश. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 15, 2021

आईचा हत्यारा कधी होईल गजाआड; मुलांचा आक्रोश.

 आईचा हत्यारा कधी होईल गजाआड; मुलांचा आक्रोश.

बाळ बोठे सापडेना; रूणाल जरेचा उपोषणाचा इशारा..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सामाजिक कार्यकर्ता रेखा जरे यांचा खून करणारा हत्यारा पत्रकार बाळ बोठे हा अडीच महिन्यांपासून फरार आहे. तो कधी गजाआड होणार? मला न्याय कधी मिळणार, असा प्रश्न रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना विचारला असून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला आहे.

रुणाल जरे याने आज, सोमवारी जिल्हा प्रशासनाला व पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना पत्र दिले आहे. त्यामुळे आता पोलीस काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यामध्ये म्हटले आहे की,’ यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याला अदयापपावेतो अटक झालेली नाही. गुन्हा घडल्यापासून मुख्य सुत्रधार हा अदयापपर्यंत फरार आहे. तसेच त्याचा ठावठिकाणा देखील पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा काय करते? असा प्रश्न मला पडला आहे. पोलीस कुठे हतबल होत आहे का? तसेच एलसीबीचे सक्षम पोलीस अधिकारी एखादया सराईत गुन्हेगारास पकडण्यास सर्व पोलीस यंत्रणा कामास लावतात, व त्यास पकडून हजर करतात. परंतु सदर मुख्य सुत्रधार व इतर गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार हे वेगळे असतात का? असा प्रश्न उपस्थित होतो. मला न्याय कसा मिळेल? अद्यापपर्यंत पोलीस अधिक्षक व तपास अधिकारी साहेब यांना वेळोवेळी भेटून तपासाबाबत विचारपूस केली असता मला अद्यापपर्यंत कोणतीही मुख्य सुत्रधार पकडण्याची हमी दिली नाही. त्यामुळे मला यापूढे कोणताही मार्ग सापडत नाही.
सदर गुन्हा घडल्यापासून आजपावेतो मुख्य सुत्रधार बाळासाहेब बोठे सापडत नाही. 75 दिवसाचा कालावधी होऊन गेला आहे. 90 दिवसांत चार्जशिट दाखल करण्याची तयारी देखील चालू झाली असेल. नगरचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार यांनादेखील याबाबत निवेदन दिले आहे. एवढे करून देखील मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा मिळून येत नाही. तसेच रोज न्यूजपेपर, टीव्ही यात पाहतो की, सराईत गुन्हेगारांना पोलीस हे सर्व यंत्रणा कामाला लावून मोठ्या शिताफीने पकडतात. परंतु आमच्या केसमध्येच असे का घडते? मुख्य सूत्रधार हा हायकोर्ट, सेशन्स कोर्ट, मध्ये त्याच्या
हितचिंतकामार्फत वकिलपत्रावर सह्या पाठवतो. तसेच प्रकरण दाखल होते तरीही पोलीसांना तो मिळत नाही.
मुख्य सूत्रधार यांची सर्व यंत्रणा काम करते. परंतु पोलिसांची सर्व यंत्रणा कमी का पडली ? त्यामुळे पोलीस यंत्रणा सक्षम असताना देखील मुख्य सूत्रधार, पत्रकार, डॉक्टरेट एवढया पदव्या असणारे देखील लोक पोलीसांना सापडत नाही. याउलट सामान्य आरोपी हा तात्काळ अटक होतो. त्यामुळे सीआयडी चौकशी करावी लागणार नाही ना? मुख्य सुत्रधार यास अटक होईल का? होईल तर कधी होईल? त्याच्यावर कडक कारवाई होईल का? असे प्रश्न मला व माझ्या कुटुंबीयांना व समाजातील सामान्य लोकांना पडला आहे. त्यामुळे मला उपोषण करण्यापलिकडे कोणताही पर्याय राहिलेला नाही. त्याशिवाय माझ्या आईला न्याय मिळणार नाही, असे मला वाटते. तरी विनंती की, मला व माझ्या कुटुंबियांसमवेत व हितचिंतकासोबत आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची परवानगी मिळावी ही नम्र विनंती,’ असेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या निवेदनाची प्रत रुणाल जरे याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह आदींना पाठवली आहे.

No comments:

Post a Comment