मनपा उपायुक्तांनी केली माळीवाडा परिसरातील भुयारी गटार योजनेची पाहणी
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः माळीवाडा परिसरातील जुना बाजार, पंचपिर चावडी, लोंढे गल्ली, आशा टॉकिज चौक आदि ठिकाणी भुयारी गटार योजनेंतर्गत सुरु असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार नगरसेवक बाळासाहेब बोराटे व परेश लोखंडे यांनी मनपा उपायुक्त यांच्याकडे केली होती. याबाबत मनपा उपायुक्त यशवंत डांगे यांनी संबंधित भागात फिरुन सुरु असलेल्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी निदर्शनास आणून दिलेल्या कामाची पाहणी करुन संबंधित ठेकेदारांना काम चांगल्या करण्याबाबत सूचना दिल्या, तसेच संबंधित अधिकार्यांना या कामाच्या दर्जाची नियमित पाहणी करुन तसा अहवाल सादर करावा, असे सांगितले.
याबाबत बाळासाहेब बोराटे यांनी अधिकार्यांना निदर्शनास आणून दिले की, ज्यावेळी हे काम सुरु झाले त्यावेळी या भागातील खड्डे खोदल्याने पिण्याच्या पाईपलाईन फुटल्या होत्या, तसेच वीज वितरणाचे वायरिंगही तुटल्या होत्या, तसेच भुयारी गटारीच्या काम करतांना त्यांची लेव्हल, योग्य आंतरावरील ड्रेनेज आऊटलेट काढण्यात आली नव्हती, याबाबत आपण मनपाच्या संबंधितांकडे तक्रार केली. त्यामुळे आज उपायुक्तांनी पहाणी करुन निकृष्ट कामे निदर्शनास आणून दिले आहेत. अधिकार्यांनी संबंधितांना सूचना देऊन दर्जेदार काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे हे काम चांगल्या पद्धतीने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
No comments:
Post a Comment