जात-धर्मभेदभाव छत्रपतींना मोडून काढला -आर.आर.पिल्ले
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ःजात-धर्म भेदभाव बाजूला सारुन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. जगाला लोकराज्याची त्यांनी दिशा दिली, असे कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे भिंगार अध्यक्ष अॅड.आर.आर.पिल्ले यांनी महाराजांना अभिवादन करतांना सांगितले.
नगर शहर व भिंगार काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने आज जुने बसस्थानक चौकात शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. यावेळी अॅड.पिल्ले बोलत होते होते. शहर काँग्रेसचे नेते बाळासाहेब भुजबळ, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, महिला काँग्रेसच्या मिना धाडगे, शारदा वाघमारे, सुमन काळापहाड, अनिल वराडे, भिंगार महिला मार्गारेट जाधव, रजनी ताठे, अभिजित कांबळे, संजय झोडगे आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment