शनिवार पासून पाणीपुरवठा विस्कळीत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 4, 2021

शनिवार पासून पाणीपुरवठा विस्कळीत.

 शनिवार पासून पाणीपुरवठा विस्कळीत.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः 33 के.व्ही मुळाडॅम वाहिनीचे तांत्रिक दुरुस्तीच्या कारणाने शनिवार दि 6 फेब्रुवारी पासून मंगळवार दि 9 फेब्रुवारीपर्यंत शहरातील पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे. मनपा पाणीपुरवठा विभागाकडून पाणी पुरवठ्यात होणार्‍या बदल व प्रसिद्धी पत्रक ही जाहीर करण्यात आले आहे.
दुपारी 12.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यत शटडाउन घेण्यात येणार आहे. तसेच सदर शटडाउन वेळेत अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे.
   या काळात मुळा नगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही. त्यामुळे शनिवार दि. 06 फेब्रुवारी 2021 रोजी बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मी नगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रोड, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर इ. भागास दुपारी 12.00 नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणीपुरवठा होउ शकणार नाही. हा पाणीपुरवठा हा दि.07 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात येईल. रविवार दि 07 फेब्रुवारी 2021 रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास म्हणजेच उदा.सर्जेपुरा, तोफखाना, सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, खिस्तगल्ली, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, सारसनगर, बुरुडगांव रोड परिसर व सावेडी इत्यादी भागात महानगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही, या भागातील पाणीपुरवठा हा रविवार ऐवजी सोमवार दि.08 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात येणार आहे.
 सोमवार दि.08 फेब्रुवारी 2021 रोजी पाणीपुरवठा होवू घातलेल्या मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, म्युनिसीपल हाडको, सावेडी इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नसून तो मंगळवार दि.9 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात येईल. शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. तरी नागरीकांनी याची नोंद घेवून असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे मनपाने आपल्या दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment