अहमदनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची एमआयआरसीला क्षेत्र भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 4, 2021

अहमदनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची एमआयआरसीला क्षेत्र भेट

 अहमदनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची एमआयआरसीला क्षेत्र भेट


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः यतीम खाना संचलित अहमदनगर हायस्कूल मराठी च्या विद्यार्थ्यांनी एमआयआरसी मध्ये जावून क्षेत्र भेट दिली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत चौगुले मेघा कुलकर्णी, शेख समीना, शेख नाजीया शेख इम्रान आदींसह शिक्षकवृंद उपस्थित होते.
   1971 रोजी भारत आणि पाकिस्तान युद्ध झाले. यामध्ये भारताचा विजय झाला या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली म्हणून एमआयआरसीमध्ये सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना युद्धामध्ये वापरण्यात आलेल्या रणगाडे, रायफल, रडार, मशीनगन, रॉकेट लॉन्चर देशभक्तीपर गीत, बँडपथक या विषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. विद्यार्थी रणगाडे व बँडपथक पाहून भारावून गेले, विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. यावेळी सुभेदार श्री. बुर्हाण यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना 1971 साली झालेल्या युद्धाविषयी माहिती देऊन युद्धात वापरण्यात आलेल्या शस्त्रे, रणगाडे आदिंविषयी माहिती दिली. तसेच यतीम खान्यातील विद्यार्थ्यांना कौतुक करून विद्यार्थ्यांना अल्प उपहार देण्यात आला. संस्थेचे विश्वस्त अ‍ॅड. फारूक बिलाल व अली मभाई हुंडेकरी यांनी एमआयआरसीच्या सर्व ऑफिसर्सचे आभार मानले.

No comments:

Post a Comment