लवकरच संपूर्ण शहराला फेजर द्वारे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा : आ. जगताप
प्रभाग 4 मध्ये फेजरद्वारे पाणीपुरवठा सुरु
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहर विकसित होत असल्यामुळे नागरी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर जलवाहिन्या टाकून अनेक वर्षे झाल्यामुळे शहरामध्ये विविध भागात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून फेज2 पाणी योजना मंजूर करून आणली व आज या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरातील काही भागांना फेजर द्वारे पाणी देण्याचे कामही सुरु झाले आहे. नगरसेविका शोभाताई बोरकर यांनी प्रभाग क्र. 4 मधील पंकज कॉलनी, निलशंकर कॉलनी, राजमाता कॉलनी, बालाजी कॉलनी, राज्य कर्मचारी सोसायटी इ. भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत होते. नगरसेविका बोरकर यांच्या उपोषणाची दखल घेत या भागाला फेजर द्वारे पाणी देण्याच्या सूचना प्रशासनास देऊन तत्काळ पाणी टंचाई दूर करण्यात आली, अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.
नगरसेविका शोभाताई बोरकर यांच्या उपोषणाच्या इशार्यानंतर प्रभाग क्र. 4 मधील पंकज कॉलनी, निलशंकर कॉलनी, राजमाता कॉलनी, बालाजी कॉलनी, राज्य कर्मचारी सोसायटी इ. भागाला फेजर द्वारे पाणीपुरवठा करण्यासाठीची पाहणी करताना आ. संग्राम जगताप, नगरसेवक स्वप्निल शिंदे, मा. नगरसेवक अजिंक्य बोरकर, उद्योजक अमोल गाडे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, सचिन जगताप, ओंकार देशमुख, शहर अभियंता सुरेश इथापे, पाणी पुरवठा विभागप्रमुख रोहिदास सातपुते, इंजि. मनोज पारखे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजिक्य बोरकर म्हणाले की, प्रभाग 4 मध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत चालली आहे. 25 वर्षापूर्वीच्या जलवाहिन्या असल्यामुळे प्रभागातील विविध भागामध्ये पाणीटंचाई निर्माण झाली होती. नगरसेविका शोभाताई बोरकर यांनी उपोषणाचा इशारा देताच आ. संग्राम जगताप यांनी तत्काळ महापालिका प्रशासनास पाणी टंचाई दूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याची दखल घेत फेजर द्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला व फेज2 द्वारे पूर्ण दाबाने पाणीपुरवठा सुरु झाल्याचे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment