नेताजींनी दिलेला लढा प्रेरणा देणारा ः डॉ. मुळे
निमगाव वाघात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात डॉ. महेश मुळे यांच्या हस्ते नेताजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, काशीनाथ पळसकर, दत्तात्रय जाधव, रामेश्वर चेमटे, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, तुकाराम खळदकर, मयुर काळे, लहानबा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, नवनाथ फलके आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. महेश मुळे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा व योगदान अद्वितीय आहे. शत्रूंना जशास तसे उत्तर देण्यासाठी त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीत दिलेला लढा प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी नेताजींचा आदर्श समोर ठेऊन युवक-युवतींनी देश सेवेसाठी सैन्यात दाखल होण्याचे आवाहन केले. पै. नाना डोंगरे म्हणाले की, नेताजींच्या विचारातून ज्वाजल्य देशभक्तीची प्रेरणा मिळते. त्यांच्या रुपाने देशाला एक नेतृत्व मिळाले होते. इंग्रजांना देशातून पळवून लावण्यात त्यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका पार पाडली असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन चरित्रावर भाषण व कविता सादर केल्या.
No comments:
Post a Comment