जुन्या पालिकेतील ऐतिहासिक भोंगा सुरु करण्यात यावा- सुरेखा कदम
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीवर ऐतिहासिक असा भोंगा आहे .दररोज पहाटे 5 वाजता व रात्री 8.30 वा तो वाजविला जातो . असा अनेक वर्षांपासून नित्य नियमाने भोंगा सुरु होता .त्यामुळे नागरिकांना एकप्रकारे सकाळची व रात्रीची सूचना मिळत असे. रात्री 8.30 वा भोंगा वाजल्यानंतर बाजारपेठ बंद करण्याची ती एक प्रकारची सूचना होती. भोंग्याची नागरिकांना इतकी सवय झाली होती कि अनेक कामे या भोंग्यानुसार घडत होती.
आज नगरमधील अनेक ऐतिहासिक गोष्टी नष्ट होत चालल्या असून ज्या आहेत त्यांचे जतन करून त्याची व्यवस्था ठेवणे हे मनपाचे कर्तव्य आहे परंतु गेल्या काही महिन्यापासून तो भोंगा बंद आहे. तरी नगरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला मनपाचा तो भोंगा लवकरात लवकर सुरु करावा असे त्यांनी सांगितले आहे. या बाबतचे निवेदन माजी महापौर सुरेखा कदम यांनी मनपा आयुक्त यांना दिले आहे.
No comments:
Post a Comment