देश संकटातून लवकरच बाहेर पडेल - बाळासाहेब भुजबळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 27, 2021

देश संकटातून लवकरच बाहेर पडेल - बाळासाहेब भुजबळ

 देश संकटातून लवकरच बाहेर पडेल - बाळासाहेब भुजबळ

काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रजासत्ताकदिना निमित्त ध्वजारोहण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः देशातील कोरोनाचे सावट लवकरच दूर होऊन पुन्हा आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल. सध्या देश अनेक संकटांमधून जात आहे. हे संकटांचे मळभही लवकरच दूर होईल असा आशावाद व्यक्त करून प्रजासत्तक दिनानिमित्त उपस्थितांना शहर काँग्रेसचे नेते बाळासाहेब भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या.
शहरातील मंगलगेट भागात काँग्रेच्या वतीने पक्ष संपर्क कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात श्री. भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा सरचिटणीस उबेद शेख यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी भिंगार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.पिल्ले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शाम वाघस्कर, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, निवृत्त पो.नि. एम.आय.शेख, अल्प संख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, सलीम रेडियम वाला,भिंगार महिला आघाडी अध्यक्षा मार्गरेट जाधव, महिला शहर जिल्हाध्यक्षा सविता मोरे, रजनी ताठे, पक्षाचे सरचिटणीस अभिजित कांबळे, मुकुंद लखापती, उपाध्यक्ष रवी सूर्यवंशी, शशिकांत पवार, संतोष धीवर, अनिल वर्हाडे, इंजि.संजय खडके, विवेक येवले, नरेंद्र भिंगारदिवे, संजय झोडगे, रमेश कदम, निझाम पठाण, राजेश बाठीया, सुभाष रणदिवे, फर्दिन खान आणि फैजल खान आदी उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. पिल्ले,उबेद शेख यांची समयोचित भाषणे झाली. देशभक्तीपर घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. श्री.वाघस्कर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.

No comments:

Post a Comment