छत्रपती व बाबासाहेबांचे विचारावरच आरपीआयची वाटचाल - ना. रामदास आठवले
सावेडी येथील आरपीआय मराठा आघाडीच्या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आरपीआय पुढे घेऊन जात आहे. याच विचाराने पक्ष चळवळीत व राजकारणात कार्यरत आहे. आरपीआयची मराठा आघाडी देखील अधिक सक्षमपणे कार्यरत असून, युवकांना यामध्ये संधी देण्यात आली आहे. आरपीआय एका समाजा पुरता मर्यादित नसून, संपुर्ण बहुजन समाजाला बरोबर घेऊन पक्षाची वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. सावेडी येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीच्या संपर्क कार्यालयाचे शुभारंभ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
मराठा आघाडीचे राज्य संघटक सिद्धार्थ सिसोदे यांनी पक्षाच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याची यावेळी माहिती दिली. सिसोदे परिवाराच्या वतीने ना. आठवले यांचा सत्कार करुन शहरात स्वागत करण्यात आले. तसेच आरपीआय मराठा आघाडीचे राज्य संघटक सिद्धार्थ सिसोदे यांच्या कार्याचे कौतुक करुन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी आरपीआय मराठा आघाडीचे राज्य संघटक सिद्धार्थ सिसोदे, डॉ. सुरेखा जाधव सिसोदे, संध्या सिसोदे, आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबालकर, नगर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, भिमसेना महासंघाचे दीपक साठे, विभागीय प्रमुख भिमराव बागुल, शहाजी कदम, शिवाजी पालवे, रविकिरण मगर, भीमसेनेचे युवक अध्यक्ष अॅड. सुमेध डोंगरे आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment