अनुसूचित जाती जमातीच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांना निवेदन
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अनूसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्यान्वये निर्मलनगर परिसरातील अलंकापुरी कॉलनीत मातंग समाजावर झालेल्या अन्याया विरुध्द गुन्हा दाखल करुन त्यांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी येथील समाज सेवकांनी ना. रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे आर पी आय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात पै अंकुश मोहिते राहुल वैराळ आर व्ही ग्रुप मित्र मंडळ अरुण ठोकळ, गौरव घोरपडे, महेश साठे, अमोल वाघचौरे, अभि सावंत आदी उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शिव-शाहू-फुले-आंबेडकर-साठे चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने आपणाकडे मागणी करण्यात येत आहे की, येथील निर्मलनगर परिसरातील अलंकापुर कॉलनी येथील मातंग समाजातील महिलांसह व्यक्तीवर घरात घुसून दि.15 डिसेंबर रोजी गुंड दिपक सावंत याने आपल्या गुंड साथिदारांसह धारदार शस्त्राने घरातील वस्तुंची तोडफोड केली. येथील असणार्या पाच दुचाक्या जाळल्या तसेच सर्व कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांनी आम्हाला धमकी दिली की, तुमच्या नावावर असलेली जमीन माझ्या नावावर न केल्यास सर्वांचे मुडदे पाडीन व जातीवाचक शिवीगाळ केली. घडलेल्या प्रकरणाने सदरील कुटुंब अत्यंत दहशतीखाली असून सदरील कुटुंबावर अन्याय करणार्याला कडक शासन होऊन या नागरीकांना न्याय मिळावा. सतेच या कुटुंबाची झालेले नुकसान तातडीने मिळावे अशी मागणी निवदेनात केली आहे.
No comments:
Post a Comment