महाराष्ट्र साहित्य परिषद नगरतर्फे पालकांसाठी विविध विषयांची निबंध स्पर्धा
नगरी दवंडी प्रतिनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अहमदनगरच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष अनिरुद्ध देवचक्के यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती सांगताना कार्याध्यक्ष किशोर मरकड म्हणाले की सदर निबंध स्पर्धा ही पालकांसाठी आयोजित केली असून यामध्ये ऑनलाइन शिक्षण सोय की गैरसोय, वाचनाने काय साध्य होते, मी आणि लॉकडाउन हे विषय घेण्यात आले आहे.
यापैकी कोणत्याही एका विषयावर किमान अठराशे ते दोन हजार शब्दांचा निबंध स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून खालील पत्त्यावर दिनांक 31 डिसेंबर पर्यंत पाठवावेत असे आवाहन कार्यवाह प्राध्यापक चंद्रकांत जोशी यांनी केले आहे. निबंध पाठवण्याचा पत्ता - किशोर मरकड कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अहमदनगर, द्वारा चैतन्य पब्लिसिटी व ट्रॅव्हल्स, रेनबो हाऊस, सावेडी रोड, अहमदनगर.
No comments:
Post a Comment