माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना शहर भाजपाच्यावतीने श्रद्धांजली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, December 26, 2020

माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना शहर भाजपाच्यावतीने श्रद्धांजली

 माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना शहर भाजपाच्यावतीने श्रद्धांजली

केंद्र सरकार जनतेच्या व शेतकर्‍याच्या हिताचे निर्णय घेत आहे : खा.डॉ.सुजय विखे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आपल्या नेतृत्व, कर्तुत्व व वक्तृत्वामुळे स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना  संपूर्ण जग ओळखते.  राजकारणाला प्राधान्य न देता देशाचा विचार करत विकासाला प्राधान्य देत त्यांनी काम केले आहे. आजचे केंद्र सरकार हे त्यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरी करत आहे. शेतकर्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार जनतेच्या व शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. शेतकर्यांच्या खात्यामध्ये 19 हजार कोटी जमा केले आहेत. केंद्र शासनाने शेतकरी कल्याण योजना राबविली. शेतकर्यांचे कल्याण करण्यासाठीच केंद्र सरकार काम करत आहे. परंतु राज्य शासन केंद्राच्या प्रत्येक योजनेला विरोध करत आहे. त्यासाठी भाजप म्हणून आम्ही शेतकर्यांसाठीच्या योजना प्रत्येक घराघरात पोहचवू, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.
स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतनिमित्त शहर जिल्हा भाजपाच्यावतीने गांधी मैदान येथील कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे, ज्येष्ठ नेते अच्युतराव पिंगळे, वसंत लोढा, सुनिल रामदासी, अनिल गट्टाणी, अनिल सबलोक, उपमहापौर मालनताई ढोणे, महिला बालकल्याण सभापती लता शेळके, महेश नामदे, अजय चितळे, तुषार पोटे, रविंद्र बारस्कर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सुनिल रामदासी म्हणाले, सुशासनामध्ये पहिली बांधिलकी ही लोकांशी असली पाहिजे. सरकारी योजनांबाबत, अंमलबजावणीही सरकारी अधिकार्यांकडून होत असते. परंतु ही नोकरशाही अनेकदा झारीतल्या शुक्राचार्यासारखे काम करत असते. केवळ सरकार लोकाभिमुख असून चालणार नाही तर अंमलबजावणी करणारे प्रशासन लोकाभिमुख असले पाहिजे.  सुशासनाची एक बाजू म्हणजे सरकार व दुसरी बाजू म्हणजे प्रशासन असते. लोककल्याणकारी राज्याचा पाया हा छत्रपती शिवाजी महाराजांनी घातला आहे. हीच संकल्पना व आदर्श घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्तविक नरेंद्र कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन महेश नामदे यांनी केले. आभार तुषार पोटे यांनी मानले. कार्यक्रमास उपाध्यक्ष जगन्नाथ निंबाळकर, नरेंद्र कुलकर्णी, सचिन पारखी, संगीता खरमाळे, संतोष गांधी, शिवाजी दहिंडे, सुनिल पंडित, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, महेश नामदे, तुषार पोटे, चिटणीस गिता गिल्डा, विलास नंदी, अविनाश साखला, ऋग्वेद गंधे, मिडिया प्रमुख अमित गटणे, आदेश गायकवाड, सुबोध रसाळ, अमोल निस्ताने, नगरसेवक रविंद्र बारस्कर, उदय कराळे, मनोज दुलम, शुभांगी साठे, गणेश नन्नवरे, अजय चितळे, मयुर ताठे, मंडल अध्यक्ष पंकज जहागिरदार, अजय चितळे, वसंत राठोड आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी अनिल गट्टाणी, वसंत लोढा, सचिन पारखी, अच्युतराव पिंगळे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भगवतगीतेचे पठण करुन गीतेचे वाटप सर्वांना करण्यात आले. तसेच सुशासन दिनानिमित्त शहर भाजपाच्यावतीने पांजरापोळ गो-रक्षण संस्थेत चारा वाटप करण्यात आला. यावेळी साहिल शेख, मुकुंद वाळके, मयुर जोशी, उमेश खांडेकर, केशव कुलकर्णी, लक्ष्मीकांत तिवारी, योगेश मुथा, आकाश सोनवणे, राकेश भाकरे, राजू मंगलारप्, कालिंदी केसकर, गुणाली मुथा, गारुडकरसर, प्रणव सरनाईक, हुजेफा शेख, राजेंद्र सातपुते, डॉ.विलास मढीकर, किरण जाधव, ज्ञानेश्वर धिरडे, अजित कोतकर, किशोर कटोरे आदि उपस्थित होते.  यावेळी प्रद्युन्य जोशी, मयुर जोशी, केशव कुलकर्णी, प्रविण भालेराव आदिंनी गीता पठण केले.

No comments:

Post a Comment