हरिओम ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांनी भरला अर्ज
नगर : ग्रामपंचायत निवडणुक 2021 साठी चिचोंडी पाटील यंथील हरिओम ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.
यामध्ये युवा नेते माजी उपसरपंच शरद खडु पवार, विद्या संदीप कोकाटे, वंदना कल्याण कोकाटे, दत्ता गुळे, मच्छिंद्र बाळू माळी, अर्चना दिलीप पवार, दिलीप कटारीया, दिलीप दत्तात्रय पवार, संतोष ज्ञानदेव कोकाटे, मंगल दिलीप कटारिया, बेबी सुधाकर दानवे, रविंद्र शहाजी पवार, चंद्रकांत साहेबराव पवार आदींनी आपले अर्ज दाखल केले आहे.
ओम ग्राव्विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर सर्व उमेदवाराचा विजय निश्चित होईल असा विश्वास बांधला आहे.
चिचोंडी पाटील भागात केलेल्या विविध विकास कामांसाह विविध प्रश्नांसाठी केलेला पाठपुराव्या मुळे नागरीक या निवडणुकीत आपल्या पॅनलला पुन्हा एकदा संधी देतील असाही विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment