स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकांमध्ये कायदा सुव्यवस्था राखावी’
जिल्हा पोलिस अधीक्षकांना भाजपाच्या वतीने निवेदन
अहमदनगर ः नगर - नगर जिल्हयात सध्या विविध तालुकामध्ये ग्रामपंचायत ,नगर पंचायत ,नगर पालिका इत्यादी निवडणुका चालू झालेले आहेत . तरी सर्व ठिकाणी कायदा व स्यव्यवस्था अबाधित राहणेसाठी सर गावामध्ये असलेल्या सराईत गुन्हेगार व अवैध व्यवसायात गुंतलेल्या व गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल असणार्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना गावामध्ये / तालुक्यामध्ये येण्यास मज्जाव करणे गरजेचे आहे .जेणे करून सदर गावातील निवडणुका शांतताप्रिय मार्गाने पार पडतील असे निवेदन देऊन जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे ,युवराज पोटे ,शामराव पिपळे ,दिलीप भालसिंग ,गणेश भालसिंग ,सचिन भालसिंग ,अंबादास बोठे आदी उपिस्थत होते . पुढे बोलताना मुंढे म्हणाले कि अवैध व्यवसायिक ,गंभीर गुन्ह्यातील आरोपी ,गाव गुंड यांना जर वेळीच आवार न घातला तर निवडणुकांच्या काळामध्ये कायदा सुव्यस्थाचे प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे शांतता प्रिय निवडणुका होणासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे त्यानी सांगितले
No comments:
Post a Comment