खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे
श्री चैतन्य कानिफनाथ गोपाळ समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य व अहमदनगर जिल्हा संघाची निवेदनाद्वारे मागणी
नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील रविंद्र साहेबराव माळी या 37 वर्षीय तरुणाची हत्या करणार्या फरारी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी तसेच पीडित कुटुंबाला न्याय व संरक्षण मिळावे म्हणून श्री चैतन्य कानिफनाथ गोपाळ समाज सेवा संघ महाराष्ट्र व अहमदनगर जिल्हा च्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
किराणा दुकानाची उधारी मागितल्याचा राग धरुन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 11 आरोपींनी एकत्र येत धारदार शस्त्राने राहता तालुक्यातील शिर्डी येथील रविंद्र साहेबराव माळी या 37 वर्षीय तरुणाचा क्रुरपणे हत्या केली. यातील काही आरोपींनी पोलिसांनी ताब्यात घेतले असून फरारी आरोपींना तात्काळ अटक करुन कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी . तसेच पिडीत कुटुंबाला आरोपीकडुन धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे. आशी मागणी श्री चैतन्य कानिफनाथ गोपाळ समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य व अहमदनगर जिल्हाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी नामदेव माळी, रघुनाथ जाधव, झेंडु पवार सर, सावंत सर, गोविंद ब्राह्मणे मेजर, एकनाथ पवार, ज्ञानदेव चौघुले उपस्थित होते.
No comments:
Post a Comment