जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून नगरसेवकांच्या अडचणी दूर करणार !
संभाजी कदम यांचा शिवसेनेच्यावतीने सत्कारनगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः शासनाच्या तसेच पालिकेच्या विविध निधीबाबत नगरसेवकांना माहिती नसते. त्यामुळे काम करतांना त्यांना अनेक अडचणी येतात. राज्यस्तरीय नगरसेवक परिषदेच्या नगर जिल्हाध्यक्षपदी माझी निवड झाल्याने या पदाच्या माध्यमातून नगरसेवकांच्या या सर्व अडचणींवर मार्ग काढून काम करू असे प्रतिपादन संभाजी कदम यांनी केले.
राज्यस्तरीय नगरसेवक परिषदेच्या नगर जिल्हाध्यक्षपदी संभाजी कदम यांची निवड झाल्या बद्दल शिवसेनेच्या वतीने त्याच्या सत्कार माजी उपमहापौर अनिल बोरुडे, युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, गटनेते संजय शेंडगे,नगरसेवक मदन आढाव, दत्ता कावरे, सचिन शिंदे,प्रशांत गायकवाड, संतोष गेनाप्पा, सुरेश तिवारी, दीपक कावळे, मुन्ना भिंगारदिवे, पप्पू भाले, सुमित धेंड, अभिषेक भोसले, प्रा.अंबादास शिंदे, दत्तात्र्य नागापुरे, अक्षय नागापुरे,प्रनिल शिंदे आदीच्या उपस्थितीत करण्यात आला.
याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले नगर जिल्हातील नगरसेवकांसाठी संभाजी कदम यांच्या पदामुळे एक व्यासपीठ निर्माण झाले आहे. नगरसेवक पदावर काम करतांना अनेक अडचणी येत होत्या आता त्या अडचणी नगर मध्ये कशाप्रकारे दूर करता येतील याबाबत संभाजी कदम यांच्या कडून माहिती घेता येईल आणि त्याच्या माध्यमातून त्या सोडवता येतील. नगरसेवकांची कोणतीही अडचण असू निधी बाबत किवा पालिका संदर्भात ती दूर करण्यात येईल. सर्व पदाधिकार्यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment