केडगाव उपनगर परिसरामध्ये तीन पाण्याच्या टाकीची निर्मिती करणार - स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केडगांव हे शहराचे एक मोठे उपनगर आहे. या भागाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी माजी महापौर मा.श्री.संदिप कोतकर यांनी केंद्र सरकार कडून फेज-1 पाणी पुरवठा योजनेसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे केडगांवचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. आमदार मा.श्री.संग्रामभैय्या जगताप यांच्या माध्यमातून केडगांवच्या उपनगराच्या विकास कामाला गती मिळाल्यामुळे मोठया प्रमाणात नवनविन भागात लोकवस्ती वाढत आहे. पुढील 50 वर्षाचा विचार करून नविन भागामध्ये पाण्याच्या टाकीची निमित्ती करण्यासाठी बायपास कांबळे मळा येथे व अरणगांव रोड शिवार परिसरात व कायनेटीक कंपनी इंदिरा नगर व हनुमान नगर परिसरामध्ये 3 नविन पाणी टाकीची निर्मिती करावयाची आहे. यासाठी जागेची पाहणी करून लवकरच टाक्याच्या कामांचा प्रस्ताव तयार करून मंजूरी घेतली जाईल व टाकीच्या कामांना सुरूवात केली जाईल असे प्रतिपादन स्थायी समितीचे सभाापती मनोज कोतकर यांनी केले.
केडगांव उपनगर परिसरामध्ये नव्याने 3 पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे प्रस्ताव तयार करण्यासाठी जागेची पाहणी करताना स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर, यंत्र अभियंता परिमल निकम, पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर.जी.सातपुते, अभियंता गणेश गाडळकर, सुधाकर भुसार, बाळू शिंदे, केशव हराळ आदी उपस्थित होते.
यावेळी मनोज कोतकर पुढे म्हणाले की, केडगांवचा झपाटयाने विकास होत असल्याने लोकवस्ती मोठया प्रमाणात वाढत आहे. यासाठी पाण्याच्या टाकीची निमित्ती करणे गरजेचे आहे. यासाठी तीन टाक्यांच्या कामाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. कायनेटीक चौक परिसरामध्ये पाण्याची टाकी बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिल्या होत्या. परंतु या परिसरामध्ये आगरकर मळा, स्टेशन, इंडस्ट्रीयल एरिया परिसरामध्ये पाण्याची टाकी असल्याने या ठिकाणी नविन पाण्याची टाकीच्या प्रस्तावाला अडचण निर्माण होत असल्याने कायनेटीक कंपनी, इंदिरा नगर व हनुमान नगर परिसरामध्ये पाण्याची टाकीचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. पाण्याच्या टाकीच्या जागेची पाहणी केली असून त्याच प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात येईल असे यंत्र अभियंता निकम यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment