जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता, नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 13, 2020

जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता, नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा

 जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता, नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
हवामान खात्याकडून जिल्ह्यात 15 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 179 टक्के पाऊस झाला असून अजूनही जोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
आजपर्यंत अहमदनगर जिल्हयात 805.06 मि.मी., 179.62% (जून ते सप्टेंबर सरासरी पर्जन्याच्या ) पर्जन्यमान झालेले आहे. जिल्हयातून वाहणार्‍या गोदावरी नदीत नादुरमधमेशर बंधार्‍यातून 404 क्युसेक व जायकवाडी धरणातुन 9432 क्युसेक, मुळा धरणातुन मुळा नदीत 600 क्युसेक, सीना धरणातून सिना नदीस 364 क्युसेक, भिमा नदीस दौड पुल येथे 3,882 क्युसेक व घोड़ नदीस 3,00 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठयात वाढ होऊन पर्यायाने नदीपातील विसर्गात देखील पाठ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील तमाम नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे, सखल भागात राहणार्‍या नागरीकाना तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करायेत. नदी, मोठे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहाये. तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासुन तसेच ओटे व नाले यापासुन दुर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर कराये, नदी अथवा ओटे नाल्यावरील पुलावस्त पाणी वाहत असल्यास पुल ओलाडू नये. पूर पाहण्यासाठी ग्दी करु नये. जुनाट/मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये, अतिवृष्टीमुळे भूसकलन होण्याची व दरडी जण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्यार्‍या लोकांनी दक्षता घ्यावी वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर कराये. धाट रस्त्याने प्रवास करणे शक्यती टाळाये. धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणार्‍या  नागरिकांनी विशेष खवरदारी घ्यापी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये, अचानक नदीच्या पाणी पातळीत काय झाल्यास जियीतास धोका उदभवू शकतो. धोकादायक ठिकाणी चढ़ अयवा तर नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असतात झाडाच्या खाली न लावता सुरक्षित ठिकाणी आश्रय द्यावा. आपत्कालीन परिस्थितीत नजीको तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र.1077 (टोल फ्री), 02412323844 वा 2356940 वर संपर्क साधण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी सेदिप निचित यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment